यावर्षी १० वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन राष्ट्रसंतांच्या गुरुकुंज मोझरीमध्ये…
MB-NEWS सुनिल घोडमारे (तिवसा, प्रतिनिधी):-लेखणीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याकरीता शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण व्हावी म्हणून दिनांक, २१ व २२ जानेवारी २०२३, रोजी गुरुकुंज मोझरी सेवाश्रमाच्या पावनभूमीत दोन दिवसीय दहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे गुरुकुंज मोझरी येथे आयोजण करण्यात आले आहे.
या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संत वाङ्मयाचे गाढे अभ्यासक किशोर सानप हे राहणार आहेत. तर शेती उद्योग क्षेत्रात भरीव कामगिरी करून – शेती उद्योगाला नवी दिशा देणारे नाशिक येथील सह्याद्री फार्म्सचे संस्थापक विलास शिंदे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. संमेलनाच्या स्वागतध्यक्षपदी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रमाचे सरचिटणीस जनार्दनपंत बोथे यांची निवड करण्यात आलेली आहे.अतिथी म्हणून विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ. रवींद्र शोभने ,अतिथी म्हणून तर विदर्भ व वऱ्हाडी कादंबरीकार तथा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य पुष्पराज गावंडे उपस्थित राहणार असल्याची माहिती विजय मुटे, राजेंद्र फड, किशोर सानप, यांनी तिवसा येथील शासकीय विश्रामगृहात आज सम्पन्न झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. शेतीप्रधान साहित्याची उणीव भरून काढण्यासाठी अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य चळवळ कार्यरत आहे.
व, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंजात आयोजित करण्यात आलेल्या संमेलनामध्ये शेतकरी कवी संमेलन, शेतकरी गझल, मुशायरा, परिसंवाद, कथाकथन असे विविध अंगी, सत्र असणार आहेत. संमेलनामध्ये ज्येष्ठ साहित्यिक, राजकीय नेते, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ, अनुभवी वक्ते सहभागी होणार आहेत, या दोन दिवसीय आयोजित केलेल्या अखिल भारतीय शेतकरी साहित्य समेलनाप्रसंगी जिल्हा तसेंच महाराष्ट्रlतुन जास्तीत जास्त शेतकरी व साहित्यिकानी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडू करण्यात आले आहे,

