पोहरा येथे झालेल्या अतिवृष्टीच्या मदतीचे घोडे अडले कुठे ?वंचित बहुजन आघाडीचे लक्षवेधी आंदोलन
जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई यांचे नेतृत्व ; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ मदत मिळावी
MB-NEWS रवि कलाने (प्रतिनिधि)अमरावती :- तालुक्यातील अतिवृष्टीबाधीत पोहरावासीयांना गेल्या एक महिन्यापासून कुठल्याही प्रकारची मदत शासनाकडून मिळाली नाही केवळ आश्वासनांचा व घोषणांचा पाऊस पाडून गेलेले शासन खऱ्या पावसाच्या सुरू होण्यापूर्वी मदत देणार का ? असा प्रश्न उपस्थित करीत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई यांनी आपल्या आंदोलनातून शासनाला केला आहे.
गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे पोहरा गावातील 19 घरांचे पूर्णतः व 383 घरांचे अंशतः नुकसान झाले होते,गावातील बाधित राहिवाश्यांनी आपला निवारा तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र हलवला परंतु येत्या काही दिवसात पावसाला सुरुवात होईल त्यापूर्वी यासर्वांना शासनाकडून मदत मिळावी यासाठी गावकऱ्यांसोबत वंचित बहुजन आघाडीने प्रशासनाला निवेदन दिले आहे
गावकऱ्यांना शासनाकडून मदत तात्काळ द्यावी तसेच अतिवृष्टी बाधीत गावकरी व वंचित च्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय व स्थानिक तहसिल कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन केले. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी व तहसिलदार यांना दिले.
१५ दिवसापर्यंत शासनाकडुन कोणतीही प्रशासकिय कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी च्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण केल्या जाईल असा इशारा सुध्दा निवेदनातुन जिल्हाध्यक्ष प्रा.शैलेश गवई यांनी दिला आहे. या आंदोलनात वंचित च्या कार्यकर्त्यांसह शेकडो गावकऱ्यांचीही उपस्थिती होती.

