Maharashtra Politics | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.

हायलाइट्स:
- हो तुम्हीच बाळासाहेबांचे पुत्र आहात
- आम्ही कधी नाही म्हटलंय का?
- पण त्यांचे नाव वारंवार का घ्यावे लागते
यावेळी रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची टीका केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. मी शिवसेनेत उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना केवळ तीनवेळा मंत्रालयात गेले आहेत. इतरवेळी ते मातोश्रीवर लपून खोके मोजण्याचे काम करत होते. तर रश्मी ठाकरे या वर्षा बंगल्यावर कंत्राटदारांना भेटत होत्या, असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला.
सुषमा अंधारेंचा रामदास कदमांवर पलटवार
रामदास कदम यांच्या आक्रमक भाषणानंतर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. रामदासभाई, आपण आज जी भाषा वापरली, त्या पातळीला उतरून आम्ही बोलणार नाही. कारण आमच्यावर आमच्या नेतृत्त्वाचे आणि कुटुंबीयांचे संस्कार आहेत. बाळासाहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं नाव वजा केल्यास आयुष्यात किती पदं मिळवू शकला असता?, हे तुमच्या अंतर्मनाला विचारा, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

