नवी मुंबईमध्ये कॅबिनेट, वन मंत्री गणेश नाईक साहेबांचे जल्लोषात स्वागत.
MB NEWS (नवी मुबंई) संजय पाटील, ब्युरोचिफ :-ऐरोली मतदारसंघाचे आमदार. गणेश नाईक साहेब यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात (कॅबिनेट) वनमंत्री खाते मिळाले. त्यानंतर नागपूर येथील हिवाळी अधिवेशन संपताच गणेश नाईक साहेबांचे नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच आगमन झाले .यावेळी संपूर्ण नवी मुंबई मधील सर्वपक्षीय विविध सामाजिक संघटना, एस बी ग्रुप स्थानिक कार्यकर्ते, अधिकारी ,लोकांच्याकडुन जल्लोषात स्वागत करण्यात आले .
नवी मुंबई येथील व्हाईट हाऊस मध्ये आगमन होताच लाखोच्या संख्येने नागरिक आधीपासूनच साहेबांच्या आगमनाची वाट पाहत उभे होते प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी, त्याचबरोबर भाजपाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने याआधी आले होते नाईक साहेबांच्या आगमनाची स्वागताची भव्य अशी तयारी आधीपासूनच केली होती. नाईक साहेब नवी मुंबईत येताच त्यांनी वाशी येतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले त्याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. मीडियासमोर बोलताना गणेश नाईक साहेब म्हणाले की मला माझ्या आवडीचं वन खातं मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रा साठी मला काम करायचं आहे. त्याचबरोबर नवी मुंबई शहरातील पर्यावरण असेल, वृक्षसंपदा असेल ती टिकवण्याबरोबरच येथील नागरिकांना स्वच्छ वातावरण कसे मिळेल यासाठी संपूर्ण उपाययोजना करण्याचं त्यांनी जाहीर केलं.

