नवीन बायपास रोड वर बॅरिकेडमुळे अपघाताची भिती अनेक दिवस रस्त्याच्या मधोमध पडून आहेत.

नवीन बायपास रोड वर बॅरिकेडमुळे अपघाताची भिती अनेक दिवस रस्त्याच्या मधोमध पडून आहेत.

MB-NEWS (चांदुर रेल्वे):- चांदूर रेल्वे शहरातील मुख्य मार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून पोलिस विभागाचे बॅरिकेड रस्त्याच्या मधोमध पडलेले असून, त्यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत आहे. याकडे पोलीस विभागाने अद्याप लक्ष दिलेले नाही. चांदूर शहराच्या मध्यवस्तीतून जाणारा चौपदरी महामार्ग कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे. हा चार रेल्वे मार्ग चंद्रपूर, वर्धा, हिंगणघाट, यवतमाळ आणि अमरावती या प्रमुख शहरांना जोडतो. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. या चौपदरी रस्त्यावर काही व्यक्ती महाराष्ट्र पोलिसांचे बॅरिकेड रस्त्याच्या मधोमध आणून रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांना अपघाताला आमंत्रण देण्याची शक्यता आहेत. या मार्गावरून चांदूर रेल्वे पोलीस व पोलीस ठाण्याचे कर्मचारी नेहमीच ये-जा करतात. मात्र रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या बॅरिकेडकडे एकाही पोलिस कर्मचाऱ्याचे लक्ष नसल्याने नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहेत. कोणत्या बॅरिकेडमुळे अनेक दिवस अपघात होऊ शकतो किंवा या मार्गावर मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे