महाराष्ट्र राज्यात 15 डिसेंबर पूर्वी कधीही पाऊस येऊ शकतो?

महाराष्ट्र राज्यात 15 डिसेंबर पूर्वी कधीही पाऊस येऊ शकतो?

बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेल्या ‘मॅनदौस’ चक्रीवादळाची तीव्रता असून, गुरुवारी (८ डिसेंबर) रात्री उशिरा चेन्नईपासून ते सुमारे ५०० किलोमीटर अंतरावर होते. या चक्रीवादळामुळे दक्षिणेकडील राज्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रातही या चक्रीवादळाचा ठळक परिणाम जाणवणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात पावसाळी स्थिती राहणार असून, या कालावधीत कधीही पाऊस होऊ शकतो. बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण, काही भागांत हलका पाऊस, तर तुरळक ठिकाणी जोरधारांचीही शक्यता आहे. ११ ते १४ डिसेंबर या कालावधीत राज्यात पावसाची शक्यता अधिक आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे