शेतकरी वर्ग यांच्या साठी मोठी बातमी :-राज्य सरकारचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईच्या रकमेत होणार दुपटीने वाढ…
▪️ अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
किती मिळणार भरपाई
▪️जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6800 रुपयांऐवजी, आता 13,600 रुपये, तर बागायती पिकांच्या नुकसानीसाठी 13,500 रुपयांऐवजी आता 27 हजार रुपये भरपाई मिळणार आहे – असा निर्णय महसूल व वन विभागाने जाहीर केला आहे…
▪️ तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी 36 हजार रुपये भरपाई मिळणार. याशिवाय, राज्य सरकारने नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. त्यामुळे आता दोन ऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे….
▪️राज्य विधी मंडळाच्या येत्या हिवाळी अधिवेशनात या निधीची तरतूद करण्यात येईल. त्यानुसार हा निधी शासन आदेशाप्रमाणे वितरित करण्याचे आदेश दिले जाणार आहेत , असेही राज्य सरकारने म्हटले आहे…

