पोलिसांनी पावती फाडताच गोलू संतापला. त्यानं तिथेच दुचाकीला आग लावली. दुचाकीनं पेट घेतला. ती जळू लागली. दुचाकी जळताना पाहून अनेक जण जमले. प्रकरण वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. गोलूसोबत वाद झालेले पोलीस निघून गेले.
आसपासच्या भागांमधील अनेक जण दुचाकी पेटत असलेल्या चौकात जमले. थोड्याच वेळात त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. एका दुचाकीवरून ३ जण प्रवास करत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मल जीत यांनी दिली. दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या तिघांनी हेल्मेट परिधान केलेलं नव्हतं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांची २ हजारांची पावती फाडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Breaking
राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा, जुन्या नियमात मोठा बदल, अशी असणार भरती प्रक्रियाचांदूर रेल्वे तालुक्यात कवठा कडू मध्ये करंट लागून गाईचा मृत्यू; विद्युत वितरण कंपनीवर शेतकऱ्याचा आरोपमहिला दिनानिमित्त पु.संत गाडगेबाबा विद्यालयात माता-पालक मेळावा उत्साहात,महिलांचा सन्मान, मार्गदर्शन व भेटवस्तू वितरणाने कार्यक्रम संपन्न.श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजन
वाहतूक पोलिसांनी पावती फाडली, तरुण संतापला; भररस्त्यात पोलिसांसमोरच बाईक पेटवली
लखीमपूर खीरी: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. शहराजवळ असणाऱ्या राजापूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गोलू नावाच्या तरुणानं भररस्त्यात स्वत:ची दुचाकी पेटवली. वाहतूक पोलिसांनी चलान कापल्यानं संतप्त झालेल्या गोलूनं त्याच्या दुचाकीला आग लावली. पोलिसांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यानं केला.

