तर उद्धव ठाकरेंकडे पक्ष आणि चिन्ह राहील, जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं

हिंगोली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथे आढावा बैठक घेत विरोधकांचा चांगला समाचार घेतला. शिवसेना पक्षाचे नाव व चिन्ह हायजॅक करण्याचा प्रयत्न पक्षातून फुटून गेलेले करताहेत, हाच मोठा विनोद आहे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे. निवडणूक आयोगावर कोणाचा प्रभाव नसेल तर उद्धव ठाकरेंकडेच पक्ष व चिन्ह राहिल,असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे गट व भाजपवर टीका केली.हिंगोलीत पत्रकार परिषदेत जयंत पाटील बोलत होते.

जयंत पाटील म्हणाले की, पुढाऱ्यांचे काही विशिष्ट संबंध गुंतल्यामुळे ते शिंदे गटाकडे गेले आहेत.कार्यकर्ते ठाकरे गटाकडे आहेत. पक्ष आणि चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. पक्षाचे नाव व चिन्ह हायजॅक करण्याचा प्रयत्न पक्षातून फुटून गेलेले करताहेत,हाच मोठा विनोद आहे. निवडणूक आयोगावर कोणाचा प्रभाव नसेल तर उद्धव ठाकरेंकडेच पक्ष व चिन्ह राहील, असं जयंत पाटील यांनी सांगितलं. राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका व विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सोबत येणे अपेक्षित आहे, अन्यथा जे सोबत येतील, त्यांच्यासोबत निवडणुका लढवणार,अशी घोषणाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

काँग्रेसच्या स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या घोषणेबाबत बोलताना पाटील म्हणाले की, काँग्रेसला स्वबळावर निवडणूक लढवायची असेल तर आम्हाला त्यावर काही बोलायचे नाही. मात्र,प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना एकत्रित लढून भाजपाला रोखण्याचे प्रयत्न होणे अपेक्षित आहे. यामध्ये काँग्रेसने सहभागी व्हावे,अशी अपेक्षा आहे.मात्र ते सहभागी झाले नाही आणि इतर पक्ष सोबत येत असतील तर त्यांना सोबत घेऊन निवडणुका लढवू, असं जयंत पाटील म्हणाले.

उद्धव ठाकरेंसाठी ‘शिवाजी पार्क’वरील दसरा मेळावा का महत्त्वाचा? शिवसेना दबाव का वाढवतेय?

राज्यातून सुमारे पाच लाख बेरोजगारांना काम देणारा प्रकल्प बाहेर राज्यात गेला यास शिंदे सरकार जबाबदार आहे. महाविकास आघाडीने मोठे प्रयत्न करून हा प्रकल्प राज्यात आणला होता. मात्र, शिंदे सरकारच्या दुर्लक्षाने हा प्रकल्प इतर राज्यात गेला, त्यानंतरही त्यांनी प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, असा आरोप जयंत पाटील यांनी केला. शिंदे सरकार दिल्लीकरांना घाबरले असल्याचे स्पष्ट होत आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रसकडून सरकारविरोधात राज्यभरात आंदोलन केले जाईल, असं जयंत पाटील म्हणाले.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यासाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी…

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त भारतात आणलेल्या चित्त्यांवरुनही जयंत पाटीलांनी भाजपवर निशाणा साधला. पाटील म्हणाले, परदेशातून आणलेल्या चित्त्यांसाठी जंगलात जिवंत काळवीट सोडणे हा क्रुरपणा आहे.त्या ऐवजी प्राणी संग्रहालयात ज्या पध्दतीने वाघ व इतर प्राण्यांना खाद्य दिले जाते त्यापध्दतीने या चित्त्यांना खाद्य दिले गेले पाहिजे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं. यावेळी आमदार राजेश नवघरे,आमदार विक्रम काळे,माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

चाचा, भाजपात या, विखे-कर्डिलेंची विनंती; तनपुरे हसत म्हणाले, मी तुमचाच आहे

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे