भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्याबरोबर ट्वेन्टी-२० मालिका खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ विश्वचषकासाठी रवाना होणार आहे. विश्वचषक ही भारतासाठी सर्वात मोठी स्पर्धा असेल. वेगवान गोलंदाजांना लवकर दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे भारताला वेगवान गोलंदाजांचा वापर सांभाळून करावा लागणार आहे. त्यामुळे भारतीय संघात वेगवान गोलंदाजांसाठी आता रोटेशन पॉलिस राबवण्यात आली आहे. त्यानुसार बुमराला सर्वच सामन्यात खेळवणार नाही. कारण बुमरा सर्व सामन्यांमध्ये खेळला आणि त्याला जर दुखापत झाली तर भारताला मोठा धक्का बसू शकतो. त्यामुळे सध्याच्या घडीला बुमरा किंवा वेगवान गोलंदाजांच्या कलेने भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे. त्यामुळे यानंतरच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या सामन्यात बुमरा दिसेल. पण तो सर्वच सामन्यांमध्ये मात्र दिसणार नाही.
या सामन्यात हर्षल पटेलला खेळण्याची संधी दिली आहे. हर्षलने या सामन्यात पुनरामगन केले आहे. पण हर्षललाही सर्व सामन्यांमध्ये खेळवणार नाहीत. कारण भारतासाठी बुमरा, भुवी आणि हर्षल पटेल हे महत्वाचे गोलंदाज आहेत. त्यामुळे या तिघांना प्रत्येक सामन्यात न खेळवता विश्रांती ही दिली जाणार आहे.

