तूर पिकाचे असे करावे व्यवस्थापन, शेतकऱ्यांना डायल आऊट काँफेरेन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन रिलायन्स फाऊंडेशनचा उपक्रम
रिलायन्स फाऊंडेशन शेतकऱ्यांसाठी विविध डिजिटल कार्यक्रमांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कपाशी पिकातील अन्नद्रव्य व्यवस्थापण व कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. सध्या हवामान बदलामुळे तूर पीक धोक्यात येण्याची शक्यता आहे. तूर पिकामध्ये सध्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तसेच फुल गळ सुद्धा मोठ्याप्रमाणात आहे त्यासाठी करावयाचे विविध उपाययोजना याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. त्यामुळे या प्रश्नाचे निराकरण करण्याचा उद्देशाने रिलायंस फॉउंडेशन माहिती सेवा यांच्या मार्फत डायल आऊट काँफेरेन्स या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमामध्ये डॉ राजेंद्र जाणे, कृषी तज्ञ यांनी शेतकऱ्यांना त्याच्या समस्यांविषयी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे आयोजन मनोज काळे, रिलायंस फॉउंडेशन व कार्यक्रम सहाय्यक सुमित मातीकाळे यांनी केले.या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांनी मिळालेल्या माहिती चा आम्हाला निश्चित लाभ होईल असे सांगितले व शेतकऱ्यांनी व तज्ञांनी रिलायन्स फाउंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले.

