मोठा राजकीय भुंकप : काँग्रेसचा मोठा गट फुटणार
MB NEWS नागपूर(प्रतिनिधी): देशातील चार महत्त्वाच्या राज्यांचे निकाल काल जाहीर झाले आहेत. या चार पैकी तीन राज्यात भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम राजकारणावर होणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे राज्याचे राजकारण ढवळले जाण्याची शक्यता आहे. भाजपच्या या विजयामुळे महाराष्ट काँग्रेसमधील एक गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे हा एक मोठा आमदारांचा गट भाजपसोबत जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

