घरकुल योजना 2023 मधील जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची चौकशी झाली पाहिजे
चांदुर रेल्वे (अतुल उज्जेनकर): तालुक्यातील आमला विश्वेश्वर गाव मधीलनोकरीवरअसणारे,पेन्शन धारक, पक्के मकान असलेले यांना तलाठी आणि ग्रामपंचायतीने पैसे घेऊनघरकुल योजनेचा लाभ दिला. तसेच या योजनेतील खरे लाभार्थी असणाऱ्यांना योजनेपासून वंचित ठेवण्यात आले. याची चौकशी झाली पाहिजे अन्यथा गावातील नागरिकांनी आमरण.उपोषण करण्याचा इशारा दिला आहे सोमवार दिनांक6/5 /2024 ला गावातील नागरिक स्थानिक सहाय्यक गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तालुक्यातील आमला विश्वेश्वर गावातील घरकुल योजनेचे खरे लाभार्थी यांना घरकुल योजने पासून वंचित ठेवले व ज्यांच्याकडे पक्के मकान आहेत जे नोकरी करतात जे पेन्शन धारक आहेत अशा नागरिकांना तलाठी आणि ग्रामपंचायत यांनी पैसे घेऊन या लाभार्थ्याचे नाव यादीमध्ये समाविष्ट केले यावेळी बोगस लाभार्थ्यांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले याची माहिती प्रशासनाला देण्यात आली व आमरण उपोषण करण्याकरिता गावातील नागरिक तयार आहेत निवेदन देतेवेळी रामेश्वर कनोजिया, किसनराव चापले, उत्तम श्रीखंडे, धनराज नागरिक कर, बेबीताई नागोसे, गोपाल कांबळे, शालिक नागरीकर, दादाराव शेवतकर, रामराव कैकाडी, मधुकर धोत्रे, गणेश चराडे शारदानंदर धने, गावातील नागरिक उपस्थित होते.
बॉक्समध्ये ( या संदर्भातील माहितीनुसार 2023 मध्ये गावातील 19 परिवार पाच दिवस आमरण उपोषण केले होते त्यावेळेस आमदार व गटविकास अधिकारी यांच्या मध्यस्थीने नागरिकांनी उपोषण सोडविले होते. यावेळी अशा बोगस लाभार्थ्यांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. तरीसुद्धा प्रशासनाने चौकशी न करता त्यावरून पाच महिने उलटून गेले आहे त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून नागरिकांनी पुन्हा निवेदन दिले आहे.

