🌨️अतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांना 755 कोटी रुपयांची मदत..
💥 *तुमच्या जिल्ह्याला मिळाला किती निधी जाणून घ्या..
➖️ अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट 2022 या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने मोठा दिलासा दिला आहे.
👉 अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील 4 लाख 38 हजार 489 हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील 36 हजार 711.31हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील 74 हजार 446 हेक्टर असे एकूण 5 लाख 49 हजार 646.31 हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे 755 कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे. या निर्णयाचा सुमारे 5 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे.
🌨️राज्यात जून ते ऑगस्ट अतिृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी 8 सप्टेंबर 2022 रोजी सुमारे 3445.25 कोटी आणि 56.45 कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. शिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास 98.58 कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार 354.07 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे.
👉 *मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ*
▪️औरंगाबाद – 12679 हेक्टर क्षेत्र
▪️जालना- 678 हेक्टर क्षेत्र
▪️परभणी- 2545.25 हेक्टर क्षेत्र
▪️हिंगोली- 96677 हेक्टर क्षेत्र
▪️ बीड- 48.80 हेक्टर क्षेत्र
▪️ लातूर- 213251 हेक्टर क्षेत्र
▪️उस्मानाबाद- 12609.95 हेक्टर क्षेत्र
▪️ यवतमाळ- 36711.31 हेक्टर क्षेत्र
▪️सोलापूर- 74446 हेक्टर क्षेत्र

