जळका (जगताप) ते विरूळ रोडचे काम शिवसेनेने पाडले बंद.निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांचे नेतृत्व…..

जळका (जगताप) ते विरूळ रोडचे काम शिवसेनेने पाडले बंद.निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांचे नेतृत्व…..

MB-NEWS :-अमरावती (चांदूर रेल्वे) –: चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका (जगताप) ते विरूळ (रोंघे) या रस्त्याचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप करीत शिवसेनेने ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांच्या नेतृत्वात काम बंद पाडले.

९ ऑक्टोंबर रोजी जळका ते विरूळ रोड चे काम खराब पद्धतीने सुरू होते. या कामावर खड्डा खोदून ८० एमएमची गिट्टी टाकली नसुन काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याची बाब शिवसेनेचे जळका येथील ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे, गजानन भरडे व शिवसेना उपशाखाप्रमुख अमोल गजभे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी लगेच सदर सुरू असलेले काम बंद करायला लावले. नंतर कंत्राटदाराच्या सुपरवायजरने कामावरील सगळे साहित्य व गाड्या विरुळ येथे नेत असतांना कौस्तुभ खेरडे यांनी त्वरित विरूळ येथील सामाजिक कार्यकर्ते चिंटू रोंघे यांच्या सोबत संपर्क साधला व सदरची बाब सांगितली. त्यानंतर विरूळचे सरपंच रुपेश गुल्हाने, उपसरपंच गोपाळ मांडुळकर यांनी रोडवर येवून दुसऱ्या बाजुने काम करू दिले नाही. यावरून सदर कामावर संबंधित विभागाचे अधिकारी यांचे लक्ष नसल्याचा आरोप उपस्थितांनी केला.

अन्यथा काम होऊच देणार नाही – कौस्तुभ खेरडे                  जळका ते विरूळ रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यानंतर मी व शिवसेनेच्या सहकाऱ्यांनी, गावकरी यांनी सदर काम बंद पाडले. संबंधित अधिकाऱ्यांनी या कामावर येऊन पाहणी करावी व चांगल्या दर्जाचे काम करायचे असले तरच काम सुरू करावे अन्यथा हे काम होऊ देणार नसल्याचा इशारा शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य कौस्तुभ खेरडे यांनी दिला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे