संयमानी, शांततेने आणि प्रशासनाशी समन्वय साधून केलेली कामे पूर्णत्वास जातात.

संयमानी, शांततेने आणि प्रशासनाशी समन्वय साधून केलेली कामे पूर्णत्वास जातात.

MB NEWS (अमरावती) – १,२,३ आणि आज ४ था सुद्धा टप्पा शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा झाल्याची चर्चा ग्रामीण भागात जोरात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अतिवृष्टीच्या मदतीचा टप्पा वळता करण्यात आला आहे. आमदार प्रतापदादा अडसड यांनी शेवटी दिलेला शब्द पूर्ण केला २४ तासाच्या आत जीआर बदलून आणला व त्यावर न थांबता शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्णतः वळता करून घेण्याकरिता सुद्धा प्रयत्न केले आणि त्याचेच आज हे फलित आहे. नुसताच शेतकऱ्यांचा खोटा कळवळा खोटा कांगावा काही स्वयंघोषित शेतकरी नेते करत निवडणुकांच्या तोंडावर आंदोलन करत असताना एक जागृत लोकप्रतिनिधी म्हणून शांततेने कार्य करत शेतकऱ्यांना आमदार प्रतापदादा अडसड यांनी एक प्रकारे दिलासा दिलेला आहे.

बातमी व जाहिरात साठी सम्पर्क करा. मंगेश बोबडे = मो. 9850184190

संपादक - मंगेश बोबडे