पोलिसांनी पावती फाडताच गोलू संतापला. त्यानं तिथेच दुचाकीला आग लावली. दुचाकीनं पेट घेतला. ती जळू लागली. दुचाकी जळताना पाहून अनेक जण जमले. प्रकरण वाढत असल्याचं पाहून पोलिसांनी तिथून काढता पाय घेतला. गोलूसोबत वाद झालेले पोलीस निघून गेले.
आसपासच्या भागांमधील अनेक जण दुचाकी पेटत असलेल्या चौकात जमले. थोड्याच वेळात त्यांनी पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयाकडे मोर्चा वळवला. एका दुचाकीवरून ३ जण प्रवास करत होते, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक निर्मल जीत यांनी दिली. दुचाकीवरून प्रवास करत असलेल्या तिघांनी हेल्मेट परिधान केलेलं नव्हतं. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांची २ हजारांची पावती फाडण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
Breaking
श्री अरुण तुकारामजी वाघ यांचे 68 व्या वर्षीअल्पशा आजाराने निधन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निरूपीत ब्रह्मविद्या प्रवचन सोहळ्याचे आयोजनछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आणि त्यांच्या जीवनकार्यावर प्रभावी व्याख्याननांदगावच्या स्वच्छता व आरोग्य सभापतींनी सौ.ज्योत्सना अमोल धवसे यांनी केली डंपिंग ग्राउंडची तातडीची पाहणीकचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याचे निर्देश;कायमस्वरूपी जागेचा प्रश्न निकाली काढणारसुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर खातेवाटप! कोणते खाते कोणाकडे? पाहा संपूर्ण यादी
वाहतूक पोलिसांनी पावती फाडली, तरुण संतापला; भररस्त्यात पोलिसांसमोरच बाईक पेटवली
लखीमपूर खीरी: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरीमध्ये एक चक्रावून टाकणारी घटना घडली आहे. शहराजवळ असणाऱ्या राजापूरमध्ये वास्तव्यास असणाऱ्या गोलू नावाच्या तरुणानं भररस्त्यात स्वत:ची दुचाकी पेटवली. वाहतूक पोलिसांनी चलान कापल्यानं संतप्त झालेल्या गोलूनं त्याच्या दुचाकीला आग लावली. पोलिसांनी लाच मागितल्याचा आरोपही त्यानं केला.

