!!परमपूज्य गुरुदयाल उपाख्य भय्यासाहेब यशवंतराव चतुर महाराज सावंगा विठोबा,कालवश !!
परमपूज्य गुरुदयाल यशवंतराव चतुर महाराज सावंगा विठोबा
परमपूज्य कृष्णाजी महाराज सावंगा विठोबा संस्थानचे सातवे गादीपती परमपूज्य यशवंत चतुर महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव गुरुदयाल चतुर महाराज यांचे दिनांक १४/१२/२०२२ बुधवारी रोजी दुपारी निधन झाले
परमपूज्य गुरु दयाल चतुर महाराज हे कृष्णाजी महाराजांचे वंशज चतुर परिवार यापैकी एक वंशज होते त्यांची कृष्णाजी महाराजांच्या वाङ्मयावर अढळ श्रद्धा होती व त्या वांग्मयाचे हे अभ्यासक होते त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये कृष्णाजी महाराजांच्या वाङ्मयाचा अखंड ध्यास, अभ्यास ,चिंतन, उलगडा व प्रसार या बाबीकडे प्रकर्षाने लक्ष दिले चतुरपती भजनाच्या माध्यमातून चतुर् पती नाम व कृष्णाजी महाराजांचा विचार घरोघरी पोहोचला पाहिजे हा त्यांचा प्रयत्न होता कृष्णाजी महाराजांच्या भाविका बरोबर जवळीक साधून चतुर पती नामाची नवी दृष्टी त्यांनी भाविकांना दिली
प्रतिकूल शारीरिक परिस्थितीमध्ये त्यांनी भाविका बरोबरचा संपर्क व नामाची ओढ कमी होऊ दिली नाही आपल्या अभ्यासपूर्ण बोलण्यातून त्यांनी भाविकांमध्ये चतुरपती नामाची तेवत ठेवली व भाविकांना डोळस श्रद्धेचे धडे दिले कृष्णाजी महाराजांचा विचार हा जगासमोर पोहोचला पाहिजे त्याचा प्रसार झाला पाहिजे कृष्णाजी महाराजांच्या विचाराने भाविक एकत्र रहावे, सावंगा गावचा विकास होऊन सावंगा गाव जगासमोर यायला पाहिजे हे त्यांनी आपल्या जीवनाचे ध्येय बनवले होते तसेच सावंगा गावचे सरपंच पद सुद्धा त्यांनी भूषवले कृष्णाजी महाराजा सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मयोगी गाडगे महाराज ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डॉक्टर पंजाबराव देशमुख त्यांचे आदर्श होते.. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा अधीपुरूष, चार मुली, जावई भाऊ गोविंद महाराज, सून व नातू असा आप्त परिवार आहे