काँग्रेसच्या 138 स्थापना दिनानिमित्त चांदुर रेल्वे काँग्रेस कार्यालय मध्ये ॲम्बुलन्स चे उद्घाटन मा. श्री. प्रा. वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते…
MB-NEWS(चांदुर रेल्वे) :-भारत देशामध्ये काँग्रेस पक्षाने ज्या देशांमध्ये सुईसुद्धा बनवत नव्हती. त्या देशाला उच्च स्तरावर नेण्यासाठी काँग्रेस पक्षाने खूप मोठे बलिदान दिले शेतकरी शेतमजूर , शिक्षण, आरोग्य, क्रीडा व सांस्कृतिक या क्षेत्रात भारत देशाचा पाया मजबूत केला सर्वांना न्याय हक्क देण्याचे काम काँग्रेस पक्षांनी केले. व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी देशासाठी आपल्या जीवाचे बलिदान दिले. असे काँग्रेस पक्ष स्थापनेला 138 व्या दिना निमित्त भारताच्या विकासाठी ज्या नेत्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या बलिदानाचा त्याग पाहून आज चांदुर रेल्वे शहरांमध्ये ॲम्बुलन्स उद्घाटन करून चांदुर रेल्वे तालुक्यातील गोरगरीब जनते च्या सेवे करिता मा.प्रा.श्री वीरेंद्र भाऊ जगताप यांनी ॲम्बुलन्स उद्घाटन केले.

यावेळी काँग्रेसचे माजी सभापती मा. प्रा. वाघ सर नगर परिषद माजी नगराध्यक्ष शिट्टू सूर्यवंशी ,नितीन गोडणे माजी जिल्हाध्यक्ष परीक्षित जगताप, शहराध्यक्ष निवास सूर्यवंशी तालुका अध्यक्ष अमोल होले ,गणेश आरेकर, परीक्षित जगताप, गहूकार काका, देवानंद खुणे, अनिस सौदागर ,सुमेद सरदार, महेश कलावटे, विलास मोटघरे, सतीश देशमुख ,रुपेश पुडके , शहेजाद सौदागर, पंकज मेश्राम, भानुदास गावंडे ,बंटी माकोडे ,सतपाल वरठे, हर्षल वाघ ,संघपाल हरणे सारंग देशमुख, नवीन तीखे, इमरान सौदागर, भीमा पवार ,रमेश गिरोळकर, धामणगाव मधील काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते

