हा वाढला विचित्रपणा!ऐसा नोहे शिमगा जाणा
राष्ट्रसंतांनी ग्रामगीता ग्रथातुन दिला होळीचा संदेश…
MB-NEWS :-(गुरुकुंज मोझरी)सुनिल घोरमाडे ता. प्र.:- ग्रामसफाई सामुदायीक रीत्या करून नाली मोरीतला कचरा साफ करून त्याची होळी करने जाळने, अथवा खताच्या गड्यात पुरणे ज्यामुळे कंपोज खत शेतीच्या उपयोगी पडते. गावाच,कुटुंबाच आरोग्य नीरोगी राहु शकते.
होळीचा आला शीमगा सण । त्यात मोठी मारहाण ।
लोक इभ्रत, मान सोडोन। पळती मार्गी वेडेसे।।
हा वाढला विचित्रपणा। ऐसा नोहे शीमगा जाणा ।
त्यातही आहे तात्विकणा । घेण्यासारिखा समाजा॥
पण होळी सणाचा खरा उद्येश बाजुला राहुन चांगली लाकड होळीत जाळने ही वाईट परंपरा झपाट्याने वाढली. त्याच समर्थन करणारा वर्ग नीर्माण झाला आहे. अनेक किर्तनकार,प्रवचनकार, प्रबोधनकार अशा मानवी जीवन उध्दवस्थ करणाऱ्या वाईट रूढ्यांचा वीरोध न करता कपोकल्पीत मनोरंजक भाकड कथा सांगत लोकसमुहाला मनोरंजनाची घुटी पाजतात. काही सत्य विज्ञानवाद सांगनाऱ्या प्रबोधन करणाऱ्यांची समाज टींगल टवाळी करतो.
होळी-धुलीवंदन बोंबा मारायचा सण, दारू मादक द्रव्याचे सेवन करण्याचा सण, गावातील हेवेदावे, राजकारण या सणात उफाळून येतात. रत्करंजीत होळी गावात खेळतांना अनेक घटनां आम्ही पाहतो. होळी-धुलीवंदनां नंतरची वर्तमानपत्रे रक्तरंजीत बातम्यांनी भरलेली असतात.
अशा सर्व धामधुमीत मोठ्या प्रमाणात युवापीढी आनंदाचे क्षण न शोधता मटन पारट्या, दारूपारट्या यालाच आनंद समजतात. हा जीवनातील आनंद नाही तर मनोरंजन आहे. मनोरंजन हा क्षणीक आनंद वाटतो पण ते दुःखाचे अनेकदा कारण ठरते. अनेकदा अपघात घडतात, मानवी सुंदर शरीर नासवते. वैरभाव वाढवने म्हणजे सण उत्सव का?
गावी वेगळाची विपर्यास झाला I ग्रामशुध्दीचा उद्येश गेला ।

