तिवसा तालुक्यातील वऱ्हा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
MB NEWS (तिवसा) ता.प्र.नंदकिशोर मते:-
गेल्या दोन वर्षांपासून सततच्या नापीकी मुळे वऱ्हा येथील अल्पभूधारक शेतकरी श्री.संदीप नामदेव टिगणे वय ५० वर्ष या तरुण शेतकऱ्यांनी आपल्या राहत्या घरी दिनांक २८/०९/२०२३ ला दुपारी ३ वाजता कीटकनाशक घेऊन आपली जीवन यात्रा संपली त्याच्याकडे मोजा वऱ्हा येथे तीन एकर शेती असून त्यामध्ये त्यांनी कपाशी व तुर या पिकाची लागवड केली होती. सुरुवातीला पावसाळा कमी झाल्यामुळे त्यांना कपाशी व तुरीची दुबार पेरणी करावी लागली उसण वारी पैसे घेऊन त्यांनी पुन्हा पेरणी केली आधीच त्यांच्यावर इंडियन ओवरसिज बँक शाखा कुऱ्हा यांचे एक लाख रुपयाचे कर्ज होते त्यात घरात शिक्षणाची दोन मुले मोठा मुलगा बीए पार्ट वन ला तर दुसरा लहान अकरावी सायन्सला त्यांचा बाहेर गावचा शिक्षणाचा खर्च सततची नापिकी मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे काढलेल्या पीक विम्याचा परतावा सुद्धा आज तागात मिळाला नाही.
घरची परिस्थिती जेमतेम आणि कर्जाचा डोंगर यामुळे त्यांनी कुणाला कुणाला न सांगता आपल्या राहत्या घरी त्यांनी आपली जीवन यात्रा संपली आता तरी सरकारने आत्महत्या थांबवाव्यात नाहीतर अजून तरुण शेतकरी आत्महत्येला प्रवृत्त होते त्यांच्या मागे आई पत्नी दोन मुले असा आत्ता परिवार आहे.

