🌧️ अमरावतीसह राज्यात पुढील ३-४ दिवस मेघगर्जनेसह पाऊस; २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट..
अमरावतीसह राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवमान विभागाने व्यक्त केली असून २५ जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे.
⛈️ *कुठे होणार पाऊस?*
राज्यात २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी पावसाची शक्यता असून ठाणे, पालघर, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
🌳 *झाडे उन्मळून पडली*
अवकाळी पावसासोबत जोराचा वारा असल्याने विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून तसेच अनेक घरांवरील पत्रे उडून गेले आहेत. कोरडवाहू शेतकरी मात्र या पावसाने समाधानी झाल्याचे दिसून येत आहे.
🌨️यासोबतच विदर्भात बुलढाणा, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, अमरावती आणि यवतमाळ आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात पावसाच्या आगमनाने येत्या काही दिवसात शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.

